CKP समाजाचे राष्ट्रास योगदान - भाग ३
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात रायरेश्वर मंदिरात १६ मे १६४५ रोजी शपथ घेऊन केली याची आपणांस बहुतेक लोकांना माहिती आहे. परंतु या शपथेशी CKP समाजाचा अत्यंत जवळून संबंध आहे याची जाणीव फारच थोड्या CKP लोकांना असते.
बाल शिवाजीराजांवर जिजाऊसाहेब संस्कार करीत होत्या. त्यांच्यासोबत शहाजीराजांनी जबाबदारी सोपविलेले चार अधिकारी त्यांना Administration चे प्रत्यक्ष धडे देत होते. त्यात रघुनाथ बल्लाळ कोर्डे हे CKP होते हे आपण मागील लेखात पहिले.
शिवाजीराजेंनी आता तारुण्यात प्रवेश केला. स्वराज्य स्थापनेची शहाजीमहाराजांची आकांक्षा त्यांना पुरी करायची होती.
पुण्याजवळ रोहीडखोऱ्याचा प्रदेश होता. दादाजी नरस प्रभू गुप्ते हे रोहीडखोऱ्याचे देशपांडे होते. रोहीडखोरे हे आदिलशाही मुलुखात येत होते. स्वराज्याचा विचार मनात आल्यावर शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू यांचे मन आपल्या सोबत येण्यास वळविले. त्यांच्या सहाय्याने प्रथम रोहिंडाकिल्ला (विचित्रगड), तोरणाकिल्ला (प्रचंडगड) आणि राजगड तसेच चाकणभोवतालचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरापुढे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वर हे दादाजी नरस प्रभू गुप्ते यांच्या जहागीरीतील रोहीडखोऱ्यात होते. या शपथग्रहण प्रसंगी खालील CKP उपस्थित होते.
दादाजी नरस प्रभू गुप्ते
रघुनाथ बल्लाळ कोर्डे
दादाजी बापुजी देशपांडे
चिमणाजी बापुजी देशपांडे
विश्वासराव नानाजी देशपांडे
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात रायरेश्वर मंदिरात १६ मे १६४५ रोजी शपथ घेऊन केली याची आपणांस बहुतेक लोकांना माहिती आहे. परंतु या शपथेशी CKP समाजाचा अत्यंत जवळून संबंध आहे याची जाणीव फारच थोड्या CKP लोकांना असते.
बाल शिवाजीराजांवर जिजाऊसाहेब संस्कार करीत होत्या. त्यांच्यासोबत शहाजीराजांनी जबाबदारी सोपविलेले चार अधिकारी त्यांना Administration चे प्रत्यक्ष धडे देत होते. त्यात रघुनाथ बल्लाळ कोर्डे हे CKP होते हे आपण मागील लेखात पहिले.
शिवाजीराजेंनी आता तारुण्यात प्रवेश केला. स्वराज्य स्थापनेची शहाजीमहाराजांची आकांक्षा त्यांना पुरी करायची होती.
पुण्याजवळ रोहीडखोऱ्याचा प्रदेश होता. दादाजी नरस प्रभू गुप्ते हे रोहीडखोऱ्याचे देशपांडे होते. रोहीडखोरे हे आदिलशाही मुलुखात येत होते. स्वराज्याचा विचार मनात आल्यावर शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू यांचे मन आपल्या सोबत येण्यास वळविले. त्यांच्या सहाय्याने प्रथम रोहिंडाकिल्ला (विचित्रगड), तोरणाकिल्ला (प्रचंडगड) आणि राजगड तसेच चाकणभोवतालचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरापुढे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वर हे दादाजी नरस प्रभू गुप्ते यांच्या जहागीरीतील रोहीडखोऱ्यात होते. या शपथग्रहण प्रसंगी खालील CKP उपस्थित होते.
दादाजी नरस प्रभू गुप्ते
रघुनाथ बल्लाळ कोर्डे
दादाजी बापुजी देशपांडे
चिमणाजी बापुजी देशपांडे
विश्वासराव नानाजी देशपांडे

No comments:
Post a Comment