Friday, 28 April 2017

रायरेश्वराची शपथ

CKP समाजाचे राष्ट्रास योगदान - भाग ३

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात रायरेश्वर मंदिरात १६ मे १६४५ रोजी शपथ घेऊन केली याची आपणांस बहुतेक लोकांना माहिती आहे. परंतु या शपथेशी CKP समाजाचा अत्यंत जवळून संबंध आहे याची जाणीव फारच थोड्या CKP लोकांना असते.

बाल शिवाजीराजांवर जिजाऊसाहेब संस्कार करीत होत्या.  त्यांच्यासोबत शहाजीराजांनी जबाबदारी सोपविलेले चार अधिकारी त्यांना Administration चे प्रत्यक्ष धडे देत होते. त्यात रघुनाथ बल्लाळ कोर्डे हे CKP होते हे आपण मागील लेखात पहिले.
शिवाजीराजेंनी आता तारुण्यात प्रवेश केला. स्वराज्य स्थापनेची शहाजीमहाराजांची आकांक्षा त्यांना पुरी करायची होती.

पुण्याजवळ रोहीडखोऱ्याचा प्रदेश होता. दादाजी नरस प्रभू गुप्ते हे रोहीडखोऱ्याचे देशपांडे होते. रोहीडखोरे हे आदिलशाही मुलुखात येत होते. स्वराज्याचा विचार मनात आल्यावर शिवाजी महाराजांनी दादाजी नरस प्रभू यांचे मन आपल्या सोबत येण्यास वळविले. त्यांच्या सहाय्याने प्रथम रोहिंडाकिल्ला  (विचित्रगड), तोरणाकिल्ला (प्रचंडगड) आणि राजगड तसेच चाकणभोवतालचा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरापुढे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रायरेश्वर हे दादाजी नरस प्रभू गुप्ते यांच्या जहागीरीतील रोहीडखोऱ्यात होते. या शपथग्रहण प्रसंगी खालील CKP उपस्थित होते.

दादाजी नरस प्रभू गुप्ते
रघुनाथ बल्लाळ कोर्डे
दादाजी बापुजी देशपांडे
चिमणाजी बापुजी देशपांडे
विश्वासराव नानाजी देशपांडे


बालशिवाजी काल

CKP समाजाचे राष्ट्रास योगदान : भाग २ Image may contain: 1 person, outdoor
आज आपण शिवाजी महाराजांच्या काळात (१६३०-१६८०) CKP समाजाचे योगदान काय होते हे पाहण्यास सुरुवात करू. शिवाजीमहाराज आणि जिजामाता यांना शिवाजी महाराजांच्या बालवयात शहाजी राजांनी आपल्या पुणे जहागीरीची व्यवस्था पाहण्यास पाठविले. यावेळी त्यांच्या मदतीला चार जणांना पाठविले.शामराज नीलकंठ रांझेकर हे 'पेशवा' (Administrator) म्हणून, बाळकृष्ण हनुमंते यांना मुझुमदार (Accountant), सोनाजीपंत यांना 'डबीर' (Secretary) तर रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांना 'सबनीस' ( Pay Master) म्हणून जबाबदारी दिली. रिसायातकार सरदेसाई यांनीही रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. अशाप्रकारे बालशिवाजी महाराजांना घडविण्यात CKP समाजाच्या रघुनाथ बल्लाळ कोर्डे यांचा हातभार लागला होता.

शहाजी राजांचा कालखंड

आपल्या समाजाने राष्ट्राला काय योगदान दिले आहे याची दुर्दैवाने आपल्या समाजास जाणीव नाही. म्हणून CKP समाजातील ज्या व्यक्तींचे मोठे योगदान आहे त्यांच्याबद्दल आपण आजपासून थोडे थोडे जाणून घेऊ या. आपण प्रथम शहाजी महाराजांपासून सुरुवात करू (१५९४ - १६६४)
पिलाजी प्रभू हे बाजी प्रभू देशपांडे यांचे आजोबा. पिलाजी हे परिंदा किल्ल्याचे किल्लेदार होते. इ.स. १६२६ नंतर निजामशाही कमकुवत झाली. तेव्हा शहाजीराजांनी स्वतंत्र होण्याचे प्रयत्न केले. तेव्हा त्यांना पिलाजी प्रभू यांची साथ होती. परंतुशहाजीराजांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
पिलाजी प्रभूंचा मुलगा कृष्णाजी प्रभू (बाजी प्रभू देशपांडेंचे वडील) हे शहाजी महाराजांच्या सैन्यात होते. निजामशाहीतर्फे कृष्णाजी प्रभू यांनी मुघल सैन्याशी लढा दिला आणि दख्खनचा बराच प्रदेश निजामाच्या अमलाखाली आणला. कृष्णाजी प्रभू हे शहाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते. अशाप्रकारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या आजोबांपासून त्यांचे कुटुंब शहाजी महाराज / शिवाजी महाराज यांच्या सेवेत होते.